(मुळशी,पुणे)
मुळशीतील ‘पौड’ याता लुक्याच्या गावापासून १० किमी अंतरावर वाघजाई डोंगराच्या पायथ्याशी ‘भादस’ गाववसलेले आहे. मुळानदीच्या तीरावरील ‘मौजेभादस बु. शिवकाळात उल्लेखले गेले आहे. या नावाने शिवशाहीतील कागदपत्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीत डोंगरकपारीतील राहणाऱ्याबलदंड आणि निष्ठावंत माणसांचे साहाय्य मिळवले. अशाच या गावचा ‘जोरीपाटील’ घराणा! त्यांचा पूर्णावस्थेत वाडा आज नसला तरी अवशेष रुपी गाव या घराण्याच्या कार्यकर्तृत्त्वाची आठवण करुन देतात.
घडी व जोती व विस्तीर्ण पसाऱ्यावरुन वाडा आपल्या नजरे समोर उभा राहतो. त्याच्या चौसोप्यांचे चिरेपडले आहेत. काही चिऱ्यांचा भैरवनाथाच्या मंदिराच्या जिर्णोध्दारात वापर झाला आहे. घोटीव, सुबकता, लांब-रुंददगडपाहून वाड्याच्यारेखीव आकृतीची कल्पना येऊ शकते. मावळातील हा रांगडा पाटील किती साधा, पण भव्य वाड्यातराहून मुकादमीचा कारभार करीत असावा? या वाड्यात ब्रिटिश अमदानीत जिल्हा लोकल बोर्डाची शाळा होती. धान्याने भरलेली बैलगाडी वाड्यात जात होती.
गावाच्या तळ्याकाठी ‘मौजे भादस येथे आमची आंब्याची झाडे व तेथे बांधला होता.’ असा उल्लेख आढळतो.
सध्या मंदीरात ‘बाजी उर्फ छबाजी’ पाटील यांचे शिल्प आहे. यांची वाघजाई पालखी दरम्यान वाटेत त्यांनी वाघाशी झुंज दिल्याची आठवण हे शिल्प करुन देते. जवळच उध्वस्त महादेव मंदीर व बऱ्याच समाधी शिळा आहेत. भैरवनाथाच्या पायऱ्यांजवळ दोन वीरगळ, गजलक्ष्मी पाहायला मिळतात. जोरी-पाटील घराण्याच्या इतिहासाची साक्ष देण्यास या पुरेशा आहेत. गावातील वेद मूर्ती कर्वे भट या घराण्याला थोरल्या पेशव्यांनी सरदेशमुखीचे हक्क दिल्याचे पत्र आहे.
अशा भादस येथील जोरी पाटील या दुर्लक्षित घराण्याचा इतिहास सध्या सापडलेल्या त्यांच्या कडील कागदपत्रांवरुन समजतो.
ऐतिहासिक वास्तुरंग-
या घराण्याकडे शिवपूर्व काला आधीपासून पाटीलकी चे वतन असल्याचे समजते. इ.स. १६१७ च्या महादजी गोसावी चिंचवडकर यांच्या कागदात जोरी मुकादम (पाटील) नतरुकेपाऊणव२४मणगलाभात, मणपाऊणदिल्हे’ असाउल्लेखआहे. दुसरा उल्लेख खामगाव (खडकवासला भोसले पाटील वाडा) येथील १०आॕक्टोबर १६७५ च्या मजहरात ‘मालोजी बीन विठोजी जोरी मुकादम हे हजर’ असल्याचा उल्लेख आहे.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत एका मजहरात हे वतनदार पाटील खरे असल्याचा निवाडा झाल्याचा दिसतो. भादस आणि संभवे या गावातील कृष्णाजी व सामजी या दोन भावांत झालेल्या तंट्यात तत्कालीन देशमुखांनी कान्होजी जोरी संभवेकर (ता. मुळशी) यांना वतन करुन दिले होते. तेव्हा देशमुख ,देशपांडे व जमेदार व महालातून सडे (साक्षीपत्र) आणवून कृष्णाजी सामजी जे पेशजी पासून वतनदार आहेत असा मजहर छ. संभाजी महाराजांसमोर झाला. सामजीयास डोंगरगाव सीमेस वसाहत करुन दिली. (सध्याच्या कोळवण जवळील डोंगरगावच्या जोरी पाटलांकडे घराण्याचे कागद आहेत).
वरील वाद पुन्हा पेशवाईत उद्भवला. संभवेकरांबरोबर वाद विकोपास जाऊन यापूर्वी सामजी आपसातल्या वादात भादस डोंगरातील खिंडीत मारला गेला.(वीरखंड). थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत एका आज्ञापत्रात मुकादम जोरी पाटील-भादस यांना सरदेशमुखी, चौथाईच्या अमलाचा उल्लेख आढळतो. तसेच दरोबस्तगाव असल्याची कागदपत्रे आहेत. वरील भादस बु.-संभवे वाद श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत मिटला. १८३२ सालच्या एका आज्ञा पत्रात पवन मावळातील मौजे मुगावडे या गावच्या माझिरे पाटलास गुन्ह्यासंबंधी पकडून आणण्याचे एक आज्ञापत्र उपलब्ध आहे. सरदेशमुखीच्या हक्कांचा, ब्रिटिश अमदानीतील कंपनी सरकारचा चलना संबंधाचा, गुन्हेगार पकडण्याचा जाहिरनामा या कागदांत आढळतो.
‘आळवस’ गाव मुळशी धरणात गेले. पूर्वी हे बाजारपेठेचे ठिकाण होते. तेथे मोठे मोठे व्यापारी होते. १८३० साली तिथे पडलेल्या दरोड्या बाबत सरकारीशि बंदीला मदत करण्यासाठी जोरीपाटलांना ताकीद नामा दिल्याचा कागद आजही पाहायला मिळतो.
यावरुन या घराण्याकडे इलाख्याची जबाबदारी होती हे सिद्ध होते. हा घराणा याभागातील मातब्बर घराणा होता.
मुळानदीच्यातीरी जमिनीची वतनपत्रे असून त्यात जोरीपाटलांची तीन गावे वसली आहेत. भोरकर सचिवांचे इलाख्यास लागूनच ही गावेवसली आहेत. सचिवांचे कोळवण हे महालाचे गाव डोंगरगावजवळ असून महालाच्या कचेरीचावाडा अजूनही सुस्थितीत पाहता येतो.
वाघजाई देवीच्या उत्सवात भादसचे जोरी पाटील व डोंगरगावचे जोरी पाटील यांत देवीचा गळाचा वाद होऊन लढाई झाली (१८४२) .एकमेकांवर हत्यारे चालवल्याने कंपनी सरकारने अठराजणांना कैद केली होती. जोरी पाटील घराणा सेनापती दाभाडे तळेगावकर व बडोदेकर गायकवाडयांच्या अखत्यारित कामगिरी करत असावा असे यांच्या संस्थानच्या स्टँम्पपेपवरील कागद सांगतो.
फोटो – भादस गाव ऐतिहासिक अवशेष.
ता. मुळशी जि. पुणे
माहितीसंकलन – विकास चौधरी
पुणे ते जोरीपाटिल वाडा
कालावधी: २-३ तास
अवघडपणाची पातळी: मध्यम
दाट जंगल आणि विस्तृत पठार यांचा संगम
– विविध फळे देणारे झाडे आणि हिरवेगार वनस्पती.
– ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे.
– हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी): आरामदायक हवामानामुळे ट्रेकिंगसाठी परिपूर्ण.
– मान्सून (जून ते सप्टेंबर): हिरवीगार वनस्पती आणि धबधबे पाहता येतात, पण ओले हवामानामुळे अतिरिक्त सावधगिरी आवश्यक आहे.
– उन्हाळा (मार्च ते मे): जास्त उष्णतेमुळे; उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लवकर सुरुवात करा.
मुळशी पुणे आणि मुंबईपासून रस्त्याने सहज पोहोचता येते. जोरीपाटील वाडा – भादस पर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांची सुविधा आहे.
किमान 3 लिटर पाणी आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवा.
– अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घ्या.
– दुपारी उष्णतेपासून वाचण्यासाठी सकाळीच सुरुवात करा.
मुळशीच्या विविध ट्रेकिंग मार्गांचा अनुभव घ्या आणि या आकर्षक प्रदेशाच्या निसर्गिक सुंदरतेत आणि सांस्कृतिक समृद्धतेत प्रवेश करा. जरी तुम्हाला साहस, शांती किंवा ऐतिहासिक अन्वेषण आवश्यक असो, मुळशी तुम्हाला एक अद्वितीय ट्रेकिंग अनुभव देतो.
Published: ऑक्टोबर 4, 2024
मुळशीच्या सान्निध्यात वेगळ्या पद्धतीने प्रवास करा